• English
  • मराठी

नवीन पनवेलमधील श्री. रामशेठ ठाकूर विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रौत्सवात स्वच्छतेचा दररोज जागर करण्यात येत आहे.

नवीन पनवेलमधील श्री. रामशेठ ठाकूर विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रौत्सवात स्वच्छतेचा दररोज जागर करण्यात येत आहे. त्याचबरोबर दांडियारास मध्येही प्लास्टिक मुक्तीसह स्वच्छतेबाबत विविध संदेश देणारी वेषभुषा करून जनजागृती आणि प्रबोधन केले जात आहे. या दरम्यान स्वच्छता अभियान सुध्दा राबवले जात आहे. स्वच्छ भारत अभियान देशभरात प्रभावीपणे राबवले जात आहे. त्या अनुषंगाने शासकिय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी सुध्दा पुढाकार घेतला आहे. या नवरात्रौत्सवात तुम्ही सुद्धा सहभावी होऊन स्वच्छतेचा संदेश द्या व नवरात्रीचा आनंद दुप्पट करा.