रायगड जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके व कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा पनवेल तालुक्यातील उलवा नोड येथील सेक्टर 19 मधील भूमीपुत्र भवनाच्या समोरील मैदानावर झाली.
रायगड जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके व कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा पनवेल तालुक्यातील उलवा नोड येथील सेक्टर 19 मधील भूमीपुत्र भवनाच्या समोरील मैदानावर झाली. मुंबई विमानतळाची क्षमता संपली असून नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कार्गो टर्मिनल्स,जेएनपीटी,एअर कार्गो तसेच वाढत्या नागरीकरणामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे इंजिन रायगड जिल्हा असणार आहे. त्यामुळे केंद्रात जे सरकार राज्यात जे सरकार तेच जिल्हापरिषदेत निवडून द्या असे आवाहनहि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलवे येथील प्रचारसभेत केले. सरकारचा कोट्यवधींचा निधी थेट जिल्हापरिषदांना देण्यात येतो त्याच्या चाव्या चोरांच्या हातात न जाता पारदर्शी कारभार करणाऱ्यांच्या हातात द्या असेही ते म्हणाले.
रायगड जिल्हयात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तीर्थरूप आप्पासाहेबांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्धल अभिनंदन करूनच भाषणाची सुरवात केली . या पुरस्काराचे श्रेय आप्पासाहेबांच्या कार्याला देत त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, यांच्यासह जिह्यातील उमेदवार तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
विमानतळ प्रकल्पग्रस्तांना बांधकाम खर्च वाढवून मिळावा,सिडको ज्या पद्धतीने लीजवर जमिनी देते तसे प्रकल्पग्रस्तांना जमिनी न देता फ्री होल्ड मिळाव्यात,स्थानिकांना रोजगार मिळणार नसेल तर सेझ रद्द करावा,नयना प्राधिकरणाने लवकरात लवकर पायाभूत सुविधांवर काम सुरु करावे,कोंढाणे-बाळगंगा-हेटवणे धरणातून वाढत्या नागरीकरणाची पाण्याची गरज पूर्ण व्हावी या आमच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. टोलमुक्तीचा,जेएनपीटीच्या साडेबारा टक्केचा,पनवेल महानगरपालिका स्थापनेचा हे महत्वाचे प्रश्न सोडवून मुख्यमंत्र्यांनी रायगडवरील प्रेम सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ५५ कोटी रुपये अलिबाग पर्यटन विकासासाठी ६३ कोटींचा आराखडा,शिवडी न्हावा लिंक रोड,खारेपाट पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निधीची तरतूद,रायगड किल्ला संवर्धनासाठी ५०० कोटींची तरतूद यासारखे महत्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतलेले आहेत. असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले .