३१ ऑक्टोबरला राज्यातील भाजपप्रणीत सरकारने यशस्वी ३ वर्षे पूर्ण केले. त्यासंदर्भात आज पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या कारकिर्दीची माहिती त्यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या परिषदेस भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद कदम यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्य माणसाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्याप्रकारे काम करीत आहे. प्रत्येक माणसाला आधार देण्याचे काम हे सरकार करीत आहे. विविध यॊजना तळागाळातील माणसापर्यत पोहोचविण्याचे काम होत असून विकासाच्या दृष्टीने फडवणीस सरकार प्रभावीपणे काम करीत आहे.
३१ ऑक्टोबरला राज्यातील भाजपप्रणीत सरकारने यशस्वी ३ वर्षे पूर्ण केले. त्यासंदर्भात आज पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या कारकिर्दीची माहिती त्यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या परिषदेस भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद कदम यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्य माणसाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्याप्रकारे काम करीत आहे. प्रत्येक माणसाला आधार देण्याचे काम हे सरकार करीत आहे. विविध यॊजना तळागाळातील माणसापर्यत पोहोचविण्याचे काम होत असून विकासाच्या दृष्टीने फडवणीस सरकार प्रभावीपणे काम करीत आहे.