• English
  • मराठी

सर्वोच्च न्यायालयाने विमानांच्या खरेदीची प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनरची निवड याबाबतीत विचार करून कोणताही गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे

राफेल विमान खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला असून राजकीय फायद्यासाठी देशाची दिशाभूल केल्याबद्दल आणि देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 
सर्वोच्च न्यायालयाने विमानांच्या खरेदीची प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनरची निवड याबाबतीत विचार करून कोणताही गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे.